Majha Vishesh : सरसकट लसीकरणासाठी आंदोलनाची वेळ आलीय का? : माझा विशेष
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाची लाट भयानक वेगानं वाढत असताना दुसरीकडे लसीबाबत सरकारच्या धोरणातही गोंधळ दिसत आहे. ज्या महाराष्ट्रात सध्या देशातल्या एकूण संख्येच्या 56 टक्के केस आहेत. त्या महाराष्ट्राला 82 लाख डोस आत्तापर्यंत मिळालेत. तर दुसरीकडे 3 टक्क्यांहून कमी अॅक्टिव्ह केसेस असलेल्या गुजरात, राजस्थानला मात्र 77 आणि 74 लाख डोस मिळालेत.
कोरोनाच्या लसीवाटपात राजकारण होतंय का?
महाराष्ट्रासारख्या ज्या राज्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलाय त्या राज्यांना डोस वाटपात प्राधान्य असायला हवं. पण तसं ते आकड्यांवरुन तरी दिसत नाहीय..कुणाला झुकतं माप आणि कुणावर अन्याय होत आहे.
असं आहे देशाचं कोरोना लस वाटप
देशात 6 एप्रिलपर्यंत 8.16 कोटी डोस दिलेले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 82 लाख, गुजरातमध्ये 77 लाख राजस्थान 74 लाख,उत्तर प्रदेश 73 लाख, पश्चिम बंगाल- 66 लाख,कर्नाटक 49 लाख, मध्य प्रदेश 45 लाख, केरळ- 40 लाख असे सर्वाधिक लसीकरण झालेली राज्यं आहेत.