Vishwas Patil: कसा बदलला 'पानिपत' चा अर्थ? जाणून घ्या विश्वास पाटील यांच्याकडून ABP Majha
मराठी साहित्यामध्ये टोळी युद्धासारखा प्रकार असून साहित्य हे गटातटात विभागलं गेलं आहे. एखाद्या कादंबरीवर समिक्षक कोण लिहिणार आणि ते कुठं छापून येणार हे आधीच ठरलेलं असतं. या समिक्षकांमुळेच मराठी साहित्याचं नुकसान झाल्याची खंत 'पानिपत'कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. एबीपी माझा आयोजित साहित्य संमेलन विशेष 'माझा कट्टा' या कार्यक्रमात ते बोलत होते.