Rain Updates पावसाचा जोर कमी होणार, कमी दाबाचं क्षेत्र गुजरात, सौराष्ट्राच्या भागातून पुढे जाणार
राज्यात पावसाचा जोर आता कमी होणार असल्याची माहिती आहे. एक कमी दाबाचं क्षेत्र ३० सप्टेंबरपर्यंत पश्चिमेकडे सरकणार आहे. हे क्षेत्र उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), दक्षिण गुजरात (South Gujarat) आणि सौराष्ट्र (Saurashtra) भागातून पुढे जाईल. सध्या कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे महाराष्ट्रावरील पावसाचे संकट काही प्रमाणात कमी होऊ शकते. १ ऑक्टोबरपर्यंत हे क्षेत्र गुजरात किनाऱ्याजवळ ईशान्य अरबी समुद्रामध्ये (Northeast Arabian Sea) पोहोचेल. या बदलामुळे राज्यातील पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.