Weather Alert: राज्यात पुढचे ५ दिवस धोक्याचे, IMD चा इशारा, 'नागरिकांनी काळजी घ्यावी'
Continues below advertisement
भारतीय हवामान खात्याने (IMD) राज्यात पुढील पाच दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने नागरिकांना आवाहन केले आहे की, 'पुढील पाच दिवस गडगडाटी वादळे, विजांचा कडकडाट आणि ताशी 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घ्यावी'. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विशेषतः कोकण किनारपट्टी आणि विदर्भात हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण समुद्र खवळलेला राहील आणि वाऱ्याचा वेग वाढलेला असेल. प्रशासनाने नागरिकांना, विशेषतः किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांना, वादळी वाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement