Water Stock | राज्यातील धरण साठा ८१ टक्क्यांवर, Mumbai च्या तलावांमध्ये ९५% पाणी!

मागील पाच दिवसांमध्ये राज्यातील धरण साठा बारा टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे राज्यातील धरण साठा एक्क्याऐंशी टक्क्यांवर पोहोचला आहे. पाच दिवसांपूर्वी हा साठा एकोणसत्तर टक्क्यांवर होता. मागील काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये एकूण पंच्याण्णव टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये तुलसी, विहार, मोडकसागर आणि तानसा हे तलाव शंभर टक्के भरले आहेत. भातसा तलावात त्र्याण्णव टक्के, मध्यवैतरणा तलावात नव्व्याण्णव टक्के आणि अप्पर वैतरणा तलावात ब्याण्णव टक्के पाणीसाठा आहे. या वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे राज्याच्या आणि विशेषतः मुंबईच्या पाणीपुरवठ्याची चिंता कमी झाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola