Voter List Row: 'निवडणूक आयोगावर सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करा', Uddhav Thackeray यांची मागणी
Continues below advertisement
राज्यातील मतदार यादीतील गोंधळावरून महाविकास आघाडी आणि मनसे आक्रमक झाली असून, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन आगामी निवडणुका रद्द करण्याची मागणी केली आहे. 'जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदानाचा अधिकार हा हिरावून घेतलाय, मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का?', असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मतदान गोपनीय असू शकते, पण मतदार याद्या कशा गोपनीय असतील, असे म्हणत राज ठाकरे यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. इतकेच नाही तर, 'निवडणूक आयोगाचा सर्व्हर महाराष्ट्रात दुसरे कोणीतरी चालवत आहे', असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. या सर्व गंभीर आरोपांमुळे राज्यातील निवडणुकांच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement