Maharashtra Unseasonal Rain : राज्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता, बळीराजा चिंतेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवकाळीच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटलाय... राज्यावरील अवकाळीचं संकट काही केल्या कमी होत नाहीए..पुन्हा एकदा अवकाळीनं अनेक भागांत अवकृपा केलीय... राज्यातील १४ जिल्ह्यांमधील तब्बल २८ हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली. नाशिक जिल्ह्यातील देवळा, नांदगाव, निफाड, सिन्नर, कळवण,ईगतपुरी, चांदवड, दिंडोरी या तालुक्यात अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान केलंय. या गारपिटीमध्ये कांदा, द्राक्ष, गहू, आंबा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय... पुण्यातही मुसळधार पावसासह काही भागात गारपीट झाली. तर तिकडे वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्याला अवकाळी पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय.. या वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, आणि पावसाचं पाणी शिरलं.. दरम्यान या नुकसानाचे ना पंचनामे होतायंत... ना नुकसानभरपाई मिळतेय... अशा परिस्थितीत करायचं काय, जगायचं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय...