Mahrashtra Unlock : माझा जिल्हा, माझी नियमावली....तुमच्या जिल्ह्यात आजपासून कोणते निर्बंध शिथिल?
जवळपास दोन महिन्यांनंतर आजपासून (7 जून) महाराष्ट्र अनलॉक होत आहे. त्यानुसार सर्वसामान्य मुंबईकरांना बेस्ट बसमधून तर पुणेकरांना पीएमपीएमएलमधून प्रवास करता येणार आहे. आतापर्यंत घरपोच मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद थेट हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन घेता येणार आहे. थिएटर्सवरच्या खुर्च्यांची धूळ आता हटणार आहे. जिममध्ये जाऊन व्यायाम करता येणार आहे तर सलून, स्पा आणि पार्लरचं शटरही उघडणार आहे. तुमच्या जिल्ह्यात कोणते निर्बंध शिथिल झाले आहेत, जाणून घेऊया