Solapur: महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची भिती;सणासुदीसाठी माल भरायचा की नाही? व्यापारी संभ्रमात

राज्यात लॉकडाऊनच्या धोरण अस्वस्थतेमुळे व्यापारी पुन्हा एकदा धास्तावले आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर नीती आयोगाने दररोज लाखोंच्या संख्येने रुग्ण सापडण्याची भीती व्यक्त केली आहे. आणि अशात निर्बंधामध्ये शिथिलता देत असताना जर बाजारात गर्दी होऊ लागली आणि रुग्ण संख्या वाढली तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यामुळे येणाऱ्या सणासुदीसाठी माल भरायचा कि नाही असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. व्यापाऱ्यांचा नेमकं म्हणणं काय आहे? त्यांच्या मनात काय भीती आहे हे जाणून घेण्यासाठी सोलापुरातून आफताब शेख आपल्या सोबत आहेत. 
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola