Chandrakant Patil : महाराष्ट्राची अवस्थापाहून संतांच्या आत्म्याला दुःख होत असेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या सामाजिक वातावरणावर महत्त्वाची टिप्पणी केली आहे. नांदेड विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये ते बोलत होते. महाराष्ट्राची सामाजिक वीण पूर्णपणे विस्कटली असल्याचे त्यांनी सांगितले. गावागावात जातीवरून जे सुरू आहे, ते महाराष्ट्राच्या विकासाला मारक असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. "महाराष्ट्राची अवस्था पाहून संतांच्या आत्म्यालाही दुःख होत असेल," असे विधान त्यांनी केले. संतांनी आपले आयुष्य एकता आणि समतेसाठी घालवले, त्यांच्या आत्म्यांना या स्थितीमुळे दुःख होत असेल असे पाटील म्हणाले. बीड जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या नेमप्लेटवर 'आण्णा' लिहिता येत नाही, या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. गावागावात सुरू असलेल्या या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या विकासाला मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे, असे त्यांचे म्हणणे होते. सामाजिक सलोखा राखणे आवश्यक असल्याचे त्यांच्या बोलण्यातून सूचित झाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola