Maharashtra : आम्ही जे पुस्तकात शिकलो तो हाच इतिहास आहे,दानवेंकडून राज्यपालांच्या वक्तव्याची पाठराखण
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याची केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पाठराखण केलीये. "आम्ही जे पुस्तकात शिकलो तो हाच इतिहास आहे'' असं म्हणत दानवेंनी राज्यपालांच्या वक्तव्याची पाठराखण केली. समर्थ रामदास हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी केलं होतं. वादंग उठल्यानंतर राज्यपालांनी स्पष्टीकरणही दिलं होतं.