Maharashtra Rains: 'कर्जबाजारी शेतकऱ्यांनी काय करायचं?', Buldhana त अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं!
Continues below advertisement
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या मोताळा (Motala) तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. 'चार एकर मका पूर्ण पाण्याखाली गेला, आता काय करायचं? कर्जबाजारी शेतकऱ्यांनी काय करावं?' असा हवालदिल सवाल एक शेतकरी विचारत आहे. आज, २ नोव्हेंबर रोजी सकाळी झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून, काढणी करून ठेवलेला मका (Maize Crop) पाण्यात तरंगत आहे. अनेक ठिकाणी तर भिजलेल्या मक्याच्या कणसांना कोंब फुटल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या भागातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, या नैसर्गिक संकटामुळे बळीराजा पूर्णपणे खचला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement