Maharashtra Rain Update :3 जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज,5 जुलैनंतर मुसळधार पावसाची शक्यता
तळ कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात 3 जुलैनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलाय. तर मुंबई, ठाणे परिसरात 5 जुलैनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण होत असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. ज्यात कोल्हापूर, सातारा, सांगलीसोबतच विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे, मराठवाड्यात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्या आलाय..