Chiplun flood : रत्नागिरीच्या चिपळूणात पुराचा हाहा:कार;वाशिष्ठी नदीला पूर, मुंबई- गोवा महामार्ग ठप्प

Continues below advertisement

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. जिल्ह्यातल्या बहुतेक नद्यांमध्ये पाणी वाढल्यानं पूरस्थिती निर्माण झालेय. चिपळून तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं शहर आणि ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाले. वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं मुंबई- गोवा महामार्गावरचा पूल वाहतुकीस बंद करण्यात आलाय त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आलेय. तर इकडे चिपळूणच्या बहादूर शेख नाका परिसरातही नदीचं पाणी घुसलंय इकडे चिपळूणच्या कापसाळ पायरवाडी परिसरात नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय, गावातही पाणी शिरलंय नदीकाठच्या सुकाई मंदीरातही पाणी घुसलंय. पूरस्थितीमुळे नागरिकांची तारांबळ उडालेय. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram