Maharashtra Power Strike | वीज कंपन्यांचा ७२ तासांचा संप, सरकारकडून MESMA लागू

Continues below advertisement
राज्यातील तीनही वीज कंपन्यांचे कर्मचारी आणि अधिकारी मध्यरात्रीपासून ७२ तासांच्या संपावर गेले आहेत. सरकारने मेस्मा (MESMA) लागू करत हा संप बेकायदेशीर असल्याचं जाहीर केलं आहे. या संपामुळे पुढील तीन दिवस राज्यातील वीज यंत्रणेची जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर असेल. राज्यातल्या अनेक प्रमुख शहरांमध्ये वीज वितरणाची समांतर जबाबदारी काही खाजगी कंपन्यांना देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला विरोध म्हणून हा संप पुकारण्यात आला आहे. वीज यंत्रणेत दोष उद्भवल्यास संपामुळे दुरुस्तीच्या कामात मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. संपादरम्यान 'अरे न्याय तू शुद्धोहा, होवो। अरे न्याय तू शुद्धोहा, नित्रा होवो।' अशा घोषणा देण्यात आल्या. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी हा पवित्रा घेतला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola