Raj Uddhav Thackeray Special Report | राज आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणात फरक काय? महत्वाचे मुद्दे पाहा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी चर्चा घडवली. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात हिंदी आणि मराठीच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी भाजप, मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे कटाक्षाने टाळले. याउलट, उद्धव ठाकरे यांच्या भाषणात राजकीय आवेश स्पष्टपणे दिसून आला. त्यांनी मराठी मुद्द्यासोबतच सत्ताधाऱ्यांवरही जोरदार आसूड ओढला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाजप, मोदी आणि एकनाथ शिंदे या तिघांचाही समाचार घेतला. 'किती लाचारी करायची? मग तो पुष्प पिक्चर पाहिलाय तुम्ही सगळ्यांनी? दाढीवरून हात फिरवून, झुकेगा नहीं साला। तशी हे गद्दार म्हणतायत, उठेगा नहीं साला। तूच बोलो, उठेगा नहीं। अरे, कसं उठणार?' असे म्हणत त्यांनी 'गद्दारां'वर निशाणा साधला. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर 'दोन व्यापारी' असे संबोधत टीका केली आणि 'कोणाच्याही लग्नामध्ये भाजपवाल्यानं बोलू नका. येतील मस्त श्रीखंड, बासुंडी, पोंग्या, मिळ्या खातील आणि त्यांना नवरा बायको भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील.' असे उपरोधिक विधान केले. या मेळाव्यानंतर भविष्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कोणकोणत्या मुद्द्यांवर एकाच पानावर असतील, हे आताच सांगणे कठीण आहे. उद्धव ठाकरे यांचा भाजप आणि शिंदे यांच्यावर हल्लाबोल आणि राज ठाकरे यांचे त्यावरचे मौन यातून त्यांच्यातील फरक स्पष्टपणे दिसून येतो.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola