Samna Editorial | प्रजा तळमळत असते, सामनाचा भाजपवर हल्लाबोल
Continues below advertisement
सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीका करण्यात आली आहे. "मोदी राज्यामध्ये केवळ उत्सवच सुरू असतात. राजा उत्सवात मग्न असतो. प्रजा तळमळत असते" अशी टीका सामनामधून करण्यात आली. सरकार देशाच्या प्रश्नांबाबत उदासीन असल्याची भूमिका मांडण्यात आली. देशाची लोकशाही, स्वातंत्र्य, संविधान आणि जनतेचा आवाज बंदीवान होऊ नये, असा संकल्प आजच्या दिवशी करण्याचे आवाहन करण्यात आले. मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे सर्वस्व गमावून चिखल पाण्यामध्ये तडफडत आहेत. पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यात कुटुंबांनी अश्रू गमावले नाहीत. भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच हा पुसल्या गेलेल्या सिंदूरचा बदला असेल, तर राष्ट्रवादाच्या हिंदुत्वाच्या गर्जना उगाच करू नका, असा सवाल उपस्थित करण्यात आला. "क्रिकेटची मॅच हे युद्ध असेल तर ऑपरेशन सिंदूरच्या गर्जना हा राजकीय खेळ होता काय?" असा प्रश्न सामनामधून विचारण्यात आला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे पार पडत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement