Nitesh Rane on MNS : 'हिंमत असेल तर मोहल्ल्यांमध्ये घुसा', नितेश राणेंचे MNS ला थेट आव्हान

Continues below advertisement
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे, विशेषतः सत्ताधारी महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. भाजप नेते नितेश राणे आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्यात रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, 'हिंमत असेल तर मोहल्ल्यांमध्ये जा', असे थेट आव्हान मतदार यादीतील घोळाच्या आरोपांवरून मंत्री नितेश राणे यांनी मनसेला दिले आहे. दुसरीकडे, 'कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत', अशा शब्दांत राणेंनी उदय सामंतांनाही नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे, ज्यामुळे महायुतीतील तणाव वाढला आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिंदे सेनेत आयाराम-गयारामांचे राजकारण सुरू आहे, तर नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे आगामी निवडणुकीत युती आणि आघाड्यांचे भवितव्य काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola