महाराष्ट्रावर लोडशेडिंगचं संकट, ऐन दिवाळीत बत्ती गुल होणार? सध्या कोळशाचा किती साठा शिल्लक?
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
11 Oct 2021 11:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : देशात कोळशाची कमतरता असून याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, राज्यातील सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट कोशळ्याअभावी बंद करण्यात आले आहेत. वीजतूट भरुन काढण्यासाठी कोयना आणि इतर 12 होयड्रो प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर हीच परिस्थिती राहीली तर शहरी/ग्रामिण भागात आठ तासाचे लोडशेडींग करावे लागेल. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर कमी करा, अशी विनंती महावितरणने केली आहे. दरम्यान, देशात कोळशाची कमतरता आणि वीज संकटाच्या चर्चांवर सरकारने वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता निराधार असल्याचे म्हटले आहे.