Kolhapur Rains : उसाच्या फडात पाणीच पाणी; तोडणी खोळंबल्यानं चिंता ABP Majha
कोल्हापुरातील अवकाळी पावसामुळे ऊस शिवारात पाणी शिरल्यानं शेतकऱ्याचं नुकसान झालंय. तोडणी खोळंबली असल्यानं साखर कारखान्याचा हंगाम अडचणीत आलाय. ऊस पुरेसा मिळत नसल्यामुळे साखर कारखाना काही काळासाठी बंद ठेवावा लागणार आहे त्यामुळे दररोज साखर कारखान्याचंही नुकसान होतंय. कोल्हापुरात ऊस नुकसानाचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय केसरकर यांनी