Almatti Dam Water Issue : अलमट्टी धरणातील विसर्गावरुन महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये महत्त्वाची चर्चा
अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे अनेक भागांना पूरस्थितीला सामोरे जावे लागते. म्हणूनच या पूरनियंत्रणाचं काम महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल, यादृष्टीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी बैठक होणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. यासाठी जयंत पाटील कर्नाटक दौऱ्यावर जात आहेत.