महाराष्ट्र अराजकतेकडे चाललाय, कायद्याचं राज्य राहिलंय का? आशिष शेलार यांचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Sep 2021 04:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi) नेते आणि मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करण्याचा सपाटाच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लावला आहे. आधी अनिल परब, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड नंतर हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप लावल्यानंतर आता सोमय्या यांच्या रडारवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आले आहेत. आज कराडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.