शेतकऱ्यांनो सावधान! अतिवृष्टीच्या मदतीवर भामट्यांची नजर, अनोळखी व्यक्तीला बँक डिटेल्स देऊ नका
अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. झालेल्या नुकसानीची भरपाईची मागणी वारंवार केल्यानंतर सरकारने काही रक्कम शेतकऱ्यांना देऊ केली. मात्र याच मदतीवर आता सायबर गुन्हेगारांची नजर आहे. मिळालेल्या मदतीची रक्कम वाढवून देतो असं आमिष दाखवत हे भामटे शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आपल्या बँक खात्यासंदर्भातली माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका, असं आवाहन औरंगाबादच्या सायबर क्राईम ब्रँचने केलं आहे.