Maharashtra Heatwave | राज्यातील तापमानात वाढ; पुढील 5 दिवस कडक उन्हाचे : हवामान खातं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Mar 2021 09:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यंदाच्या वर्षी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात अंंगाची लाहीलाही सुरु झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा 40 अंशाजवळ पोहोचला आहे. काल चंद्रपुरात राज्यातील सर्वाधिक 39.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल अकोल्यात 39.1आणि ब्रह्मपुरीत 38.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलीये. तर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्याचं कमाल तापमान वाढ झाली आहे. त्यामुळे अंगाची काहीली होतेय. राज्यात पुढील पाच दिवस तापामानाचा पारा चढाच राहणार आहे.