Maharahstra Hit Wave : उत्तरेकडील उष्णतेची लाट सक्रीय, राज्याची काहिली होणार : ABP Majha
एकीकडे मान्सून लवकर येण्याची खूशखबरी जरी हवामान खात्यानं दिली असली तरी राज्यात पुढील ४ दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हावमान खात्यानं दिला... उत्तरेकडून उष्णतेच्या लहरी सक्रीय झाल्यानं राज्यातला पारा ४५ अंशापार जाणार असल्यचां हवामान खात्यानं सांगितलं. राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आलाय. महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात या राज्यांनाही या उष्णतेच्या लाटेचा फटका बसणार आहे.