गोवंश हत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आयोग स्थापन करण्यास मान्यता, 8 वर्षानंतर मंजुरी
abp majha web team
Updated at:
23 Mar 2023 10:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगाय, बैल आणि बैलांच्या कत्तलीवर बंदी असणाऱ्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आयोग स्थापन करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने अखेर मान्यता दिली आहे... उच्च न्यायालयाने हा कायदा कायम ठेवल्यानंतर तब्बल 8 वर्षानंतर राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिलीये... असा आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे हरियाणा आणि गोव्यानंतरचे तिसरे राज्य ठरणार आहे. गोमांस बंदीमुळे राज्यातील गायींची संख्या वाढेल असा अंदाज शिंदे-भाजप सरकारकडून व्यक्त करण्यात आला असून आयोगासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये...