Maharashtra : तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्रानं दिलेला निधी महाराष्ट्र सरकारकडून खर्चच नाही : PIB
abp majha web team
Updated at:
05 Jan 2022 09:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे केंद्राकडून कोरोना रोखण्यासाठी निधी मिळत नाही अशी ओरड सुरू असताना महाराष्ट्र सरकारनं केंद्रानं दिलेला निधी खर्चच केला नाही अशी माहिती समोर आलीय. पीआयबीनं दिलेल्या आकडेवारीत हे वास्तव समोर आलंय... कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी महाराष्ट्राला केंद्राकडून १ हजार २९४ कोटी रुपयांचा निधी देण्याचं प्रस्तावित होतं. त्यातले केंद्राने राज्य सरकारला ६८३ कोटी दिले.. मात्र त्यापैकी फक्त ०.३२ टक्के निधीच राज्य सरकारनं खर्च केल्याचं पीआयबीनं म्हटलंय... त्यामुळे एवढा निधी देऊनही तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी खर्च का झाला नाही असा प्रश्न विचारला जातोय