Nanar Refinery Project बाबत महाराष्ट्र सरकारचं मत बदललं?काय म्हणाले मंत्री धर्मेंद्र प्रधान
abp majha web team
Updated at:
28 Mar 2022 02:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणात स्थानिकांच्या विरोधामुळे रखडलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची चर्चा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या वक्तव्यामुळे सुरु झालीय. नाणार प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारचं मनपरिवर्तन होत असल्याचं दिसत असल्याचं प्रधान यांनी म्हटलंय. दैनिक लोकसत्ताच्या मुंबईतील कार्यक्रमात प्रधान यांनी हे वक्तव्य केलंय. नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचं आणि रोजगाराचं योगदान देण्याची क्षमता आहे, असं प्रधान म्हणाले.