Prashant Padole On BJP शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर मोदी फडणवीसांना उडवून देऊ - प्रशांत पडोळे

Continues below advertisement
महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रश्न विचारला आहे. 'तुम्ही समजा आम्हाला एक लाख रुपये आमच्या शेतकऱ्याला तुम्ही नाही दिलेला नाही आमच्या शेतकऱ्यांचे हक्क दिला नाही साहेब तर यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही', असा इशाराच या शेतकऱ्याने दिला आहे. पीक विमा योजनेअंतर्गत केवळ १८ रुपये मिळाल्याचा दावा करत या शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि अशा स्थितीत मिळालेली तुटपुंजी मदत ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. सरकारने एक लाख रुपयांची मदत न दिल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, या त्याच्या वाक्याने एक वेगळाच अर्थ सूचित केला असून, राज्य आणि केंद्र सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola