Farmer Protest: 'मंत्र्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल', Ravikant Tupkar यांचा सरकारला थेट इशारा
Continues below advertisement
शेतकरी कर्जमाफीच्या (Loan Waiver) मागणीसाठी शेतकरी नेते आक्रमक झाले असून, बच्चू कडू (Bachchu Kadu), अजित नवले (Ajit Nawale) आणि रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) हे मुंबईत सरकारसोबतच्या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. 'जर सरकारने आमच्यासोबत दगाफटका केला तर महाराष्ट्रातला शेतकरी या सरकारमधल्या लोकांना कधी माफ करणार नाही, त्यांना रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल,' असा थेट इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून, शेतकऱ्यांच्या मातीच्या लढाईत ते सहभागी झाले आहेत. कापूस (Cotton) आणि सोयाबीनला (Soybean) योग्य भाव मिळावा, पीक विम्याचे पैसे मिळावेत आणि 'बाय हुक ऑर कुक' कर्जमाफी करावीच लागेल, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement