Maharashtra coronavirus : राज्यभरात काल दिवसभरात 26 हजार 538 नव्या कोरोनाबाधितांची नोंद ABP Majha
ज्या वेगानं कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, ती पाहून सरकार आणि प्रशासनाची झोप उडालीय. राज्यात काल दिवसभरात २६ हजार ५३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय... तर मुंबईतही कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झालीय... मुंबईत तब्बल १५ हजार १६६ नव्या रुग्णांची नोंद झालीय... त्यामुळे आता मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का?, असा प्रश्न उपस्थित होतोय... कारण २० हजार रुग्णसंख्या आढळल्यानंतर मुंबईत लॉकडाऊन लावला जाईल अशी माहिती मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले होतोय... त्यामुळे आता मुंबईबाबत प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...