Maharashtra : रोजीरोटी बंद करायची नाही, आरोग्याचे नियम पाळण्यात हलगर्जीपणा नको : मुख्यमंत्री
एकीकडे मध्यरात्रीपासून मिनी लॉकडाऊनची अर्थात नव्या निर्बंधांची अंमलबजावणी होणार आहे..तर दुसरीकडे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी स्पष्ट केलंय... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला कळकळीचं आवाहन केलंय. कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका.कुणाचीही रोजीरोटी बंद करायची नाही. पण आरोग्याचे नियम पाळण्यात हलगर्जीपणा नको अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला साद घातली आहे.. तसंच नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना आणि पोलिसांना दिलेत..