Maharashtra Collage Reopen : राज्यात 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू; विद्यार्थ्यांना काय वाटतं?

कोरोनामुळे दीर्घकाळापासून बंद असलेली महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. मात्र यासाठी विद्यार्थी तसंच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काही नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याविषयीची माहिती दिली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं विद्यार्थ्यांना आवश्यक असणार आहे. महाविद्यालयं सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नियमावली असणार आहे. त्या त्या जिल्ह्यातली परिस्थिती पाहून हे ठरवलं जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महाविद्यालयं सुरू ठेवायची का, हा निर्णय घेण्याचे अधिकार सर्वस्वी स्थानिक प्राधिकरणाला असतील. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola