Maharashtra Collages: राज्यातील महाविद्यालयं सुरु ठेवायची की नाही? यावर उद्या संध्याकाळी निर्णय

राज्यातील महाविद्यालयं सुरू ठेवायची की नाही या संदर्भात उद्या संध्याकाळी ४ वाजता निर्णय जाहीर होणार आहे. महाविद्यालयांसंदर्भात आज सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत कोविड १९ संसर्गाबाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या सोबत आरोग्य सुरक्षितते बद्दल सविस्तर चर्चा झाली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola