Maharashtra Budget Session : शेतकऱ्यांचे प्रश्न, वारिसे हत्याकांड या मुद्द्यांवरुन सरकारला घेरणार?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरवात होतेय... तत्पूर्वीच म्हणजे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच आरोप-प्रत्योरोपांवरून राजकारण चांगलंच तापलंय... काल सत्ताधाऱ्यांचा चहापानाचा कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला... शेतकऱ्यांच्या ताटात संकटांचा कडू घास पडलेला असताना, सरकारच्या चहापानाचा गोडवा घेणं, हा महाराष्ट्रद्रोह ठरेल असं म्हणत अजित पवार यांनी सरकारवर कडाडून टीका केली होती... या शिवाय अनेक मुद्यांवरुन अजित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला... अजित पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय... दरम्यान, या अधिवेशनात सत्तासंघर्ष, शेतमालाचे पडलेले भाव, पत्रकार शशिकांत वारिसे, पोटनिवडणूक, यासह अनेक मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे...