Marathwada Farmers : बळीराजा का होतोय हतबल? मराठवाड्यात 5 महिन्यांत 391 शेतकऱ्यांना संपवलं आयुष्य
abp majha web team
Updated at:
18 Jun 2023 10:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठवाड्यात काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. याबाबत एक भयाण वास्तव समोर आलंय. गेल्या पाच महिन्यांत मराठवाड्यातील तब्बल 391 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केलीय. गंभीर बाब म्हणजे शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यातील आहेत. या पाच महिन्यांत बीडच्या 98 शेतकऱ्यांनी त्यांच्या आयुष्याची अखेर केलीय. रोज सरासरी तीन शेतकरी आपले जीवन संपवत असल्याचं भयानक चित्र मराठवाड्यात पाहायला मिळतंय.