Farm laws : केंद्राच्या कृषी कायद्यात बदल करुन राज्य सरकार नवा कृषी कायदा करणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करत महाविकास आघाडी सरकार आता राज्यात नवीन कृषी कायदा लागू करण्याचा तयारीत आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी केंद्राच्या कायद्यात अनेक बदल केले जाणार आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर फौजदारी गुन्हा दाखल करून कारावास होऊ शकतो. आशा प्रकारची तरतूद या कायद्यात केली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यात शेतकऱ्यांना संरक्षण नाही त्यामुळे हा कायदा शेतकरीविरोधी असल्याचं सांगत देशभरामध्ये आंदोलन झाली. बिगर भाजप राज्यात हा कायदा लागू करणार नाही. अशी भूमिका अनेक राज्यांनी घेतली. महाराष्ट्रात ही महाविकास आघाडी सरकारने या कायद्याला विरोध केला. या कायद्यात सुधारणा करून राज्य सरकार नवीन कायदा आणत आहे. विधी व न्याय विभाग हा कायदा बनवण्याच काम करत आहे. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा कायदा सभागृहात मांडला जाण्याची दाट शक्यता आहे. केंद्राच्या कृषी कायद्यात राज्य सरकार महत्त्वाचे तीन बदल करणार आहेत.