Majha Maharashtra Majha Vision | 'आरे संदर्भातील प्रश्न हा महाराष्ट्र सरकारचा आहे' - प्रकाश जावडेकर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरे संदर्भातील प्रश्न हा महाराष्ट्र सरकारचा आहे. आरे संदर्भातील विषय केंद्राकडे आलेला नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रकाश जावडेकर म्हणाले, सर्व शहरात इलेक्ट्रील बस आणणे आणि शहरातील हवा शुद्ध ठेवणे हा आमचा प्रयत्न आहे. पर्यावरणाचा समतोल आणि विकास हे आमचे धोरण आहे. आरे प्रकल्प ही एक राजकीय प्रक्रिया आहे. आरेचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर निर्णय बदलण्यात आला आहे. या संदर्भात मी फक्त दिल्ली मेट्रोचं उदाहरण देतो. दिल्लीत मेट्रो प्रकल्पासाठी जेवढी झाड तोडली. तेवढीच पुन्हा वाढवली.