Letter War : महिला सुरक्षेच्या प्रश्नावरुन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये रंगलं 'लेटर वॉर'

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पुन्हा एकदा लेटर वॉर पहायाला मिळत आहे.  राज्यातील महिला सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था याविषयी चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, असे निर्देश देणारं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. "हा विषय साकीनाक्याच्या घटनेपुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावं, अशी मागणी राज्यपालानी पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री शहांकडे करावी", असं मुख्यंत्र्यांनी म्हटले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola