Land Dispute| Chandrapur: Meshram कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारला, जमिनीचा वाद कायम
Continues below advertisement
परमेश्वर मेश्राम यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसांच्या आत संपूर्ण प्रकरणाचा तपास करून जमीन कायदेशीर मालकाच्या नावे करण्याचा आदेश दिला. भद्रावती तहसील कार्यालयामार्फत हा आदेश जाहीर करण्यात आला होता. या आदेशानंतर मेश्राम कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारला. मात्र, विवादित शेतीतला साडे तीन एकर भाग आजोबांच्या नावानं होणार असल्याने वारसांना अतिशय कमी जागा मिळणार आहे. यामुळे पीडित कुटुंबियांनी धानोरकरांच्या ताब्यातील जमीन लवकरात लवकर परत देण्याची मागणी केली आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, "आम्ही बॉडी स्वीकारली आहे आणि तहसीलदारांनी म्हटलंय की ते सात दिवसांमध्ये आमचा फेरफार करून देणार आहे. इतका छोटा आम्ही घेऊन, इतका छोटा हिस्सा घेऊन आम्ही काय करणार आहोत? कुठे जाणार आहोत?" या प्रश्नाने त्यांच्या मनातील अस्वस्थता स्पष्ट होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही जमिनीच्या वाटपावरून कुटुंबाचा संघर्ष सुरूच आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement