Andhrapradesh Bus Fire : आंध्र प्रदेशात बसला भीषण अपघात, २५ जणांचा होरपळून मृत्यू
Continues below advertisement
आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) Kurnool जिल्ह्यात झालेल्या भीषण बस अपघातात (Bus Accident) 25 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शोक व्यक्त केला आहे. 'Kurnool जिल्ह्यातील अपघातामुळे झालेले मृत्यू अत्यंत दुःखद आहेत', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटलं आहे. हैदराबादहून बंगळुरूला जाणाऱ्या एका खाजगी बसने दुचाकीला धडक दिल्यानंतर हा अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतला, ज्यात दुचाकीस्वारासह 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर, तेलंगणा सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख आणि जखमींना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement