कोल्हापुरात पुन्हा एकदा व्यापारी-प्रशासन आमनेसामने? व्यापाऱ्यांना मिळालेली 5 दिवसांची मुदत संपली
कोल्हापुरातील व्यापारी आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाच दिवसांची मुदत दिल्यानंतर आजपासून पुन्हा एकदा कोल्हापुरातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत..मात्र व्यापाऱ्यांच्या काही संघटना दुकाने सुरू करण्यावर ठाम आहेत. पाच दिवसांमध्ये कोल्हापूर शहरात पॉझिटीव्हीटी रेट वाढला नाही असा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आम्हाला सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केलीय.