Kolhapur Flood : कोल्हापुरातून मुंबईला होणारा गोकूळचा पुरवठा उद्या बंद राहणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jul 2021 01:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही गावात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. आंबेवाडी, चिखली गावात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे.शहरातील सुतार माळ परिसरात अनेक घरात पाणी शिरलं आहे. चिखली गावातील लोकांना स्थलांतरित केले आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांसह कोल्हापूर शहरातही पाणी यायला सुरुवात झाली आहे.पुणे-बंगलोर महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 49 फुटांवर आहे, पुढच्या काही वेळात पाणी पातळी 50 फुटांवर पोहोचणार आहे.