Panchganga River Pollution | नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्यानं नागरिक आक्रमक
कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा आता प्रदूषणामुळे काळवंडली आहे. याचा फटका नदीकाठच्या नागरिकांना तसेच जलचरांना बसला असून इचलकरंजी शहराजवळ असलेल्या तेरवाड बंधाऱ्यावर लाखो मासे मृतावस्थेत तरंगताना दिसत आहेत. या प्रश्नावर तेरवाडचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना बांधून ठेवल्याचा प्रकार घडलाय.