चित्तलवाडी गावातील भयाण वास्तव, वर्षभरात 40 ग्रामस्थांचा किडनीच्या आजाराने मृत्यू | स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2020 10:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकोला जिल्ह्यातील चित्तलवाडी गावात किडनी आजाराचा प्रकोप सुरू आहे. गेल्या वर्षभरात या गावात किडनीच्या आजाराने 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गावातील पाण्याच्या स्त्रोतांमध्ये सिलिका या घटकाचं प्रमाण अधिक असल्यानं गावात हा आजार बळावलाय. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून गावकऱ्यांच्या शुद्ध पाण्याच्या मागणीकडे ना सरकारनं लक्ष दिलं ना प्रशासनाने. जीवन देणारं पाणीच विष झाल्यानं गावाची अवस्था सैरभैर झाली आहे. या गावाची सध्यस्थिती जाणून घेण्यासाठी पाहुया आमचे अकोल्याचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांच्याकडे.