Jitendra Awhad : विशाल गडावरील प्रकारणातून दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरु
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमला या प्रकरणात काही माहिती नाही . मला कोणी काही सांगितलेल नाही. त्यामुळे मी काही बोलणं योग्य ठरणार नाही. Byte: जितेंद्र आव्हाडः आमचं म्हणणं होतं की नोटीस द्यावी अजित पवारांचे म्हणणे होते की आम्ही हायकोर्टात आहोत, नोटीस देता येणार नाही. अजित पवारांना सुप्रीम कोर्टात यायचं नव्हतं, हायकोर्टात जायचं होते. कारण या प्रकरणाला उशीर करायचं होतं. सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाई यांच्या केस मध्ये दिलेल्या निर्णयाची ही थट्टा आहे. कोर्ट म्हणाले, हे आम्ही टॅग करत नाही पण दोन्ही केसची सुनावणी होणार आहे. आमचं म्हणणं की विधानसभा निवडणूकी पूर्वी यावर निकाल यायला पाहीजे. कारण ही लोकशाहीची हत्या आहे. ३ सप्टेंबरला सुनावणी होईल. त्यापूर्वी उत्तर दाखल करावं लागणार आहे. जितेंद्र आव्हाडः सुप्रीम कोर्ट म्हणाले होते की आमच्या पुढे विधानसभा अध्यक्षांनी एक पाऊल पुढे टाकलंय का… याचा अर्थ स्पष्ट आहे. विशालगडाची लोक ५ जुलैला पोलिसांना भेटून सांगितलं होते की आम्हाला भिती होते. काहीतरी घडणार आहे. मायबाप सरकार आम्हाला वाचवं असं म्हणाले. पण प्रशासनानं ऐकलं नाही. दर्ग्याचा खूप जुना इतिहास आहे. तिथे शिवाजी महाराज राहीले होते. तिथल्या गावात पहिल्यांदाच मशिद फोडली कुराण फाडून फेकून दिलं. तिजो-या फोडल्या. हे तर दरोडेखोर आहेत.