Jalna Mumbai Vande Bharat : जालना ते मुंबई दरम्यान कोणत्या स्थानकांवर वंदे भारत एक्सप्रेस थांबणार ?
abp majha web team
Updated at:
30 Dec 2023 11:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalna Mumbai Vande Bharat : जालना ते मुंबई दरम्यान कोणत्या स्थानकांवर वंदे भारत एक्सप्रेस थांबणार ? उद्घाटनानंतर 1 जानेवारीपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे. आठवडय़ातून सहा दिवस वंदे भारत ट्रेन धावणार आहे. जालना आणि मुंबईदरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस जालना रेल्वे स्थानकातून पहाटे 5.05 मिनिटांनी सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ही गाडी दुपारी 12 वाजता पोहोचेल, तर दुपारी 1.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटेल आणि जालन्यात रात्री 8.30 वाजता पोहोचणार आहे. या ट्रेनला छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक आणि ठाणे असे चार थांबे आहेत.