जळगावात भीषण अपघात, टेम्पो पलटून 16 मजुरांचा मृत्यू

जळगावात भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.  किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात टेम्पो पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. यात आभोडा येथील 12 , केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत तर  5 गंभीर जखमी झाले आहेत.  मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ आयशर टेम्पो पलटून हा अपघात झाला, ज्यात 16 जणांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश मृतक हे रावेर तालुक्यातील असल्यानं तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola