Iqbal Singh Chahal EXCLUSIVE : लॉकडाऊन नाही, निर्बंध वाढवणार! : इकबाल सिंह चहल
लॉकडाऊन लावायचा की नाही हे नागरिकांनी ठरवावे. कारण त्यांनी जर नियमांचे पालन केले नाही तर कोरोना रुग्णांची संख्या वाढून निर्बंध आणखी कडक करावे लागतील असे वक्तव्य मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी केले. लॉकडाऊनबाबत दोन महत्त्वाचे निकष, आहेत. हॉस्पीटलमध्ये किती बेड भरले आणि किती शिल्लक आहेत. दुसरा म्हणजे ऑक्सीजनचा वापर. कारण ऑक्सीजनचा वापर जर वाढला, हॉस्पीटलमध्ये लोक मोठ्या प्रमाणात दाखल झाले तर लॉकडाऊनबाबत निर्णय होऊ शकतो असेही चहल म्हणाले. कोरोनाच्या आकड्यांवर लॉकडाऊन होऊ शकत नाही तर हॉस्पीटलच्या वापरावर निर्णय होणार असल्याचेही ते म्हणाले.