Uber Cup : 73 वर्षांनी भारताकडे थॉमस- उबेर चषक ABP Majha

भारतानं थॉमस उबेर कप बॅडमिंटनमध्ये इतिहास रचलाय. स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात भारतानं पहिल्यांदाच थॉमस कपवर आपलं नाव कोरलंय. स्पर्धेची पहिल्यांदाच अंतिम फेरी खेळणाऱ्या भारतासमोर बलाढ्य इंडोनेशियाचं कडवं आव्हान होतं. पण लक्ष्य सेननं पहिल्या सामना तीन सेट्समेध्ये जिंकून भारताला आघाडीवर नेलं. त्यानंतर पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक रानकीरेड्डी या जोडीनं भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तर किदंबी श्रीकांतनं अखेरच्या सामन्यात जोनाथन क्रिस्टीचा दोन सेट्समध्ये धुव्वा उडवला. आणि या स्पर्धेच्या फायनलमध्ये  भारतानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola